Sunday, August 8, 2021

चिंतन -वृत्ती

चिंतन १... भर्तृहरी एक कवी,त्याने माणसाचे एकूण चार प्रकार सांगितले आहेत १. ' माझे वाटोळे झाले तरी चालेल;पण जगाचे चांगले व्हायला हवे.गरज पडली तर मी लोकांचे पाय धरेन;पण आयुष्यात कधी कोणाचे पाय ओढणार नाही ' असा विचार करून तसे वागणारी माणसे. २. ' माझे चांगले होण्यासाठी कुणाचे नुकसान झाले तरी चालेल.एकदा का सगळे माझ्या मनासारखे झाले की मग मी दुसऱ्यासाठी विचार करेन.माझे पोट भरल्यानंतर मी लोकांच्यासाठी काय करता येईल याचा विचार करेन. ' असा विचार करणारी माणसे. ३. ' माझे चांगले होणे याला माझी सर्वोच्च प्राथमिकता असेल भले त्यासाठी इत्तरांचे वाटोळे झाले तरी चालेल.मी फक्त माझाच विचार करेन.' असे वागणारी माणसे. आणि ४. ' माझे वाटोळे झाले तरी हरकत नाही; पण माझ्याबरोबर सगळ्यांचे वाटोळे व्हायला हवे. मला जर सुख मिळणार नसेल तर माझ्याबरोबर सर्वांच्या आयुष्यात केवळ दुःखच असायला हवे ' असा आततायी विचार करून तसेच वागणारी माणसे. खरे तर इतरांचे वाईट चिंतून या जगात सर्व प्रकारची सुखे मिळूनही खऱ्या अर्थाने मिळालेले सुख कोणीही उपभोगू शकत नाही.... .... प्रल्हाद दुधाळ

No comments:

Post a Comment