Sunday, May 8, 2016

गती ते सद्गती

गती ते सद्गती.

  परवा मित्रांबरोबर गप्पा चालू होत्या. विषय होता रूटीन  जीवनातल्या  बदलाचे महत्व. आयुष्य जर समरसतेने जगायचे असेल  तर  दैनंदिन आयुष्यात  वरचेवर  थोडाफार  बदल  असायला हवा. क्षणभरासाठी का होईना पण  आपल्या  कंटाळवाण्या आयुष्यात  जो जाणीवपुर्वक बदल करतो त्याला  जगण्यासाठी नव्याने उर्जा मिळते. रटाळ जगणे म्हणजे  आयुष्याला असलेली  रूक्ष अशी  गती !
या गतीमधे काही  सकारात्मक बदल केले  तरच जीवनात प्रगती होते. थांबला तो संपला! एका जागी थांबले तर  एक प्रकारचे साचलेपण  येते . गती,मग ती शिक्षणात असेल तर   स्वत:ला  गती  असलेल्या  विषयांचे सखोल ज्ञान मिळवता येते. त्यासाठी आपल्याला कोणत्या  विषयात गती आहे हे  जाणून  घ्यायला  हवे. एकदा  का ते समजले की मग त्या विषयात पारंगतता मिळवणे सोप्पे होवून जाते, पण  उगाच   आपल्याला गती नसलेल्या  विषयात  ओढून ताणून प्रगती करण्याचा अट्टाहास  आयुष्यभरासाठी महागात पडू शकतो. असा  अट्टाहास  जीवनातील  प्रगतीऐवजी  अधोगतीस कारणीभूत होवू  शकतो! कुणाला  व्यवसायात,कुणाला नोकरीत,कुणाला एखाद्या अभिजात कलेमधे गती असू शकते. ज्याने त्याने  जर वेळीच  स्वत:चा नैसर्गिक कल  ओळखून  त्या दिशेने  प्रामाणिकपणे  प्रयत्न केले  तर  नक्कीच  प्रगती  होते  व  आयुष्याला  अपेक्षित असलेली  गती  मिळते . ड्रायव्हिंग करताना  आपण जसे कुठे थांबायचे, कधी गती  वाढवायची, कधी  गती कमी  करायची,  कोणत्या  दिशेला  वळायचे या सर्व  बाबींचे  भान ठेवागती असेल तरच जीवनात प्रगती होते. थांबला तो संपला. गती मग ती शिक्षणात असेल तर विषयांचे सखोल ज्ञान मिळवता येतेआपल्याला कोणत्या  विषयात गती आहे हे का एकदा समजले की मग त्या विषयात पारंगतता मिळवणे सोप्पे होवून जाते,पण  उगीच  गती नसलेल्या  विषयात  ओढून ताणून प्रगती करण्याचा अट्टाहास महागात पडू शकतो. कुणाला  व्यवसायात,कुणाला नोकरीत,कुणाला एखाद्या अभिजात कलेत गती असू शकते. ज्याने त्याने  जर वेळीच  स्वत:चा नैसर्गिक कल  ओळखून  त्या दिशेने  प्रामाणिकपणे  प्रयत्न केले  तर  नक्कीच  प्रगती  होते  व  आयुष्याला  गती  मिळते . ड्रायव्हिंग करताना जसे कुठे थांबायचे,  कधी गती  वाढवायची, कधी  गती कमी  करायची वा  कोणत्या  दिशेला  वळायचे याचे भान ठेवावे  लागते आणि तसे  गतीत  केलेल्या बदलानुसार  आपण इप्सित स्थळी   पोहोचू  शकतो  त्या प्रमाणेच  मानवी  जीवनात  गतीचे  भान ठेवून  वाटचाल केली  तर  जीवनातील  अंतीम  धेय्य -  सद्गतीपर्यंत  पोहचता येते.

,,,,,,,,,प्रल्हाद दुधाळ  पुणे .९४२३०१२०२० .

No comments:

Post a Comment