Friday, October 25, 2013

रोखठोक.


              रोखठोक.  
         काही माणसे मनात येईल ते बोलून टाकतात.राग,लोभ जे व्हायचे ते होऊ दे असा विचार करून जी काही  मनातली भावना असेल ती रोखठोक बोलतात. अशा स्पष्ट वक्तेपणामुळे समोरचा माणूस  दुखावला तरी त्याची ते पर्वा करत नाहीत. जे खरे आहे ते बोलल्यामुळे किंवा वास्तव समोर ठेवल्यामुळे जरी तात्पुरता वाईटपणा आला. तरी तो घेण्याची अशा माणसांची तयारी असते. अशा प्रसंगी ऐकणाऱ्याला जे आहे ते जरी कटू असले तरी सत्य काय आहे हे माहीत होते. गप्प राहून किंवा गुळमुळीत उत्तर देऊन वेळ निभावून नेण्याच्या भागुबाई  वृत्ती पेक्षाहा रोखठोकपणा शत पटींनी चांगला.यातून फार तर आजचा दिवस निभावला जातो. पण आज ना उद्या सत्य समोर येते व केवळ वाईटपणा घ्यायला नको म्हणून केलेला खोटेपणाही उघड होतो. अशा केलेल्या खोटेपणामागे बऱ्याच वेळा तात्कालिक स्वार्थ असतो! अशा प्रसंगी परस्परात गैरसमज वाढू शकतात. खरे तर योग्य वेळी खरी परिस्थिती समोर ठेवली तर समोरचा माणुसही जमिनीवर राहून विचार करू शकतो.जे आहे त्यांचा स्वीकार करून पुढची वाटचाल करू शकतो. पण ......

                  पण नाही म्हणायला जे धैर्य लागते ते सर्वांपाशी कुठे असते?

                असे रोखठोक वागण्याची तेव्हढीच मोठी किंमतही मोजावी लागेल या जाणीवेने व भित्रेपणामुळे लोक असा वाईटपणा घेत नाहीत!  

No comments:

Post a Comment