मला वाटते की वर वर मी जात मानत नाही असे म्हणणारे लोकही स्वत:ची जात कुरवाळत असतात.भारतीय माणुस फक्त परदेशात असला की भारतीय असतो.परराज्यात असला की त्याचा राज्याबद्द्ल अभिमान जागा होतो आणि मग त्याच क्रमाने जिल्हा तालुका व गावाचा गर्व दाखवला जातो पण समाजात वावरताना मात्र धर्म आणि जातीवर जातो.फेसबुक सारख्या माध्यमातही असे जातीनिहाय कळप तयार झाले आहेत .जोपर्यंत सर्व सरकारी कागदपत्रातुन जातीचा रकाना नष्ट होत नाही तोपर्यंत जाती व जातीभेद नष्ट होणे अवघड आहे.
.........प्रल्हाद दुधाळ
.........प्रल्हाद दुधाळ
No comments:
Post a Comment