Wednesday, November 18, 2020

विचारचक्र आणि घटना

 आपले विचार आणि घटना....

  गेली अगणित वर्षे माणूस आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांसाठी त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीला किंवा व्यक्तींना दोष देत आलेला आहे.त्याच्या या विचार धारणेमुळे  तो आपल्या मनात कुणाबद्दल तरी मत्सर घृणा असूया अशा भावना बाळगून दुःखात जगतो आहे.

   खरं तर माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या अथवा वाईट घटना या त्याने त्याच्या मनात भरलेल्या चांगल्या अथवा वाईट विचारांचा परिपाक असतो.

    आपल्या अंतर्मनात रात्रंदिवस जे विचारचक्र चालू असते त्या विचारांमध्ये जर भीती चिंता,अंधश्रद्धा,इर्षा,असूया आणि द्वेष अशा भावना भरलेल्या असतील तर तशाच घटना जीवनात विविध समस्यांच्या/घटनांच्या स्वरूपात समोर येतात.

     आपण आनंदात जगायचे की यातना भोगायच्या हे माणसाची विचार करण्याची पध्दती ठरवते. 

अवचेतन मन हे नेहमीच तटस्थ वृत्तीचे असते आणि त्यामध्ये चांगले काय आणि वाईट काय याचा फरक करण्याची शक्ती  किंवा भावना नसते ,म्हणूनच जर आपल्या अवचेतन मनातील विचार जर वाईट व नकारात्मक स्वरूपाचे असतील तर प्रत्यक्ष जीवनातही केवळ तसेच वाईट व नकारात्मक अनुभव येत राहील. 

  आपले अवचेतन मन जसा विचार करेल तशाच घटना समोर येत रहातात म्हणून आपले विचार बदलले तरच जीवनात सकारात्मक बदल जाणवेल... 

   (ज्ञानकण वेचलेले १)

   ....©प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment