लेखाजोखा माझ्या आयुष्यातील २०१५ चा.
म्हणता म्हणता २०१५ ही संपल. परवा परवा पर्यंत लोकानी विचारले की "काय मग किती दिवस आहे अजून नोकरी?" मी उत्साहाने सांगायचो "आहेत अजून पाचेक वर्षे" .पण आज मी पुन्हा एकदा हिशोब केला.अरेच्चा, आता तर धड साडेचार वर्षे सुध्दा नाही राहीली नोकरीची!
खर तर गेले चौतीस वर्षे नोकरी करतोय.अनेक कडू गोड आठवणी आहेत नोकरीतल्या, पण त्या पुन्हा कधीतरी! आजचा विषय आहे तो सरत्या वर्षाचा माझ्या जीवनापुरता लेखाजोखा काय आहे?अख्ख्या वर्षाचा हिशोब मांडला आणि लक्षात आले की खुपच संमिश्र असे अनुभव दिले २०१५ ने. यात या सालाचा काहीच दोष नाही."येतो आणि जातो, शिकवून जातो काळ हा ." असे मीच माझ्या एका कवितेत म्हटले आहेच की!
२०१५ सालासाठी मी एक स्वप्न पाहीले होते ते एका पुस्तकाच्या प्रकाशनाचे.हे स्वप्न साकार नक्कीच झाले.महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री शेजवलकर यांच्या अध्यक्षतेखाली व् जानेवारी २०१५ मधील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्री श्रीपाल सबनीस यांचे हस्ते माझा "सजवलेले क्षण " हा कविता संग्रह पुण्यातील चपराक प्रकाशन तर्फे प्रकाशित झाला.चपराक चे संपादक घनश्याम पाटील यांच्या सहकार्याने हे माझे स्वप्न साकार झाले.त्यांच्या सानिध्यात अनेक पत्रकार व् साहित्यिक यांची ओळख झाली.लेखन करण्यास प्रेरणा मिळआली.एकूण सहा दिवाली विशेषांकात साहित्य छापून आले.कविता लिहीतच होतो आता कथा व् लेखही लिहितोय.या क्षेत्रात थोडेफार नाव झाले ते या २०१५ मधेच!
फेसबुक व् वाट्स अप वर या वर्षी अनेक मित्र जोडले गेले.अनेक साहित्यिक मित्र यादीत आले.कुबेर सारखा फेसबुक ग्रुप जोडला गेला .ज्ञान व् माहीती मिळण्याची सोय झाली.अनेक साहित्यिक व् वाचक तेथे भेटले.चारोळ्या कथा व् कविता लिहिण्याचे सातत्य या ग्रुप्स च्या निमित्ताने वाढले.
आत्तापर्यंत च्या नोकरीत जवळ जवळ पंचवीस वर्षे मला फिल्ड मधे काम करावे लागले पण गेले सहासात वर्षे त्या मानाने कामाचा बोजा कमी असलेले पद सध्या मला मिळाले आहे.फार कटकटी नसलेले काम असल्यामुले ऑफिस च्या आघाडीवर २०१५ माझ्यासाठी अत्यंत चांगले गेले.
या वर्षी या ना त्या कारणाने अनेक ठिकाणी देवदर्शनासाठी प्रवास केला.कालभैरव नाथ जोतिबा,तुकाईमाता,कालूबाई,यमाई निरा नरसिंगपूर अशा अनेक देव देवतांचे मनोभावे दर्शन झाले. वयाची पंचावन्न वर्षे या अध्यात्मिक क्षेत्राकड़े नाही म्हटले तरी माझे दुर्लक्ष झाले होते. २०१५ मधे मनापासून आत्मिक समाधानासाठी मी श्री श्रीपादश्रीवल्लभ यांच्या चरित्राचे पारायण केले.दत्तजयंतीला श्री दत्त दिगंबरासमोर नतमस्तक झालो.आता या पुढील आयुष्यात अध्यात्म हाच आनंदी व समाधानी जगण्याचा आधार आहे याचे भान २०१५ या वर्षातच मला आले.
कौटुंबिक आघाडीवर मात्र २०१५ हे तसे यथायथाच गेले.या वर्षी कुटूंबात काही छोटे मोठे अपघात झाले. अगदी जीवाच्या संकटातून काही सदस्य वाचले.काही सदस्य सतत आजारी होते. घरात काही काळ अशांती होती पण प्रभू कृपेने यातून बाहेर पडण्याचा मार्गही मिळत गेला व् पुढेही मिळत राहील.
आर्थिक आघाडीवर ना नफा ना तोटा अशी काहीशी स्थिती होती.
२०१५ तर आता संपले आता उत्सुकता आहे २०१६ ची.हे वर्ष मात्र सर्वच आघाड्यांवर उत्साही भरभराटीचे असणार आहे यात शंका नाही . हे वर्ष मला तर उत्तम जाणारच आहे पण माझ्या बरोबरच आपणा सर्वाना आनंदाचे समाधानाचे उत्तम आरोग्याचे व् भरभराटीचे जाओ ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो .
शुभम भवतु.
.......प्रल्हाद दुधाळ
म्हणता म्हणता २०१५ ही संपल. परवा परवा पर्यंत लोकानी विचारले की "काय मग किती दिवस आहे अजून नोकरी?" मी उत्साहाने सांगायचो "आहेत अजून पाचेक वर्षे" .पण आज मी पुन्हा एकदा हिशोब केला.अरेच्चा, आता तर धड साडेचार वर्षे सुध्दा नाही राहीली नोकरीची!
खर तर गेले चौतीस वर्षे नोकरी करतोय.अनेक कडू गोड आठवणी आहेत नोकरीतल्या, पण त्या पुन्हा कधीतरी! आजचा विषय आहे तो सरत्या वर्षाचा माझ्या जीवनापुरता लेखाजोखा काय आहे?अख्ख्या वर्षाचा हिशोब मांडला आणि लक्षात आले की खुपच संमिश्र असे अनुभव दिले २०१५ ने. यात या सालाचा काहीच दोष नाही."येतो आणि जातो, शिकवून जातो काळ हा ." असे मीच माझ्या एका कवितेत म्हटले आहेच की!
२०१५ सालासाठी मी एक स्वप्न पाहीले होते ते एका पुस्तकाच्या प्रकाशनाचे.हे स्वप्न साकार नक्कीच झाले.महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री शेजवलकर यांच्या अध्यक्षतेखाली व् जानेवारी २०१५ मधील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्री श्रीपाल सबनीस यांचे हस्ते माझा "सजवलेले क्षण " हा कविता संग्रह पुण्यातील चपराक प्रकाशन तर्फे प्रकाशित झाला.चपराक चे संपादक घनश्याम पाटील यांच्या सहकार्याने हे माझे स्वप्न साकार झाले.त्यांच्या सानिध्यात अनेक पत्रकार व् साहित्यिक यांची ओळख झाली.लेखन करण्यास प्रेरणा मिळआली.एकूण सहा दिवाली विशेषांकात साहित्य छापून आले.कविता लिहीतच होतो आता कथा व् लेखही लिहितोय.या क्षेत्रात थोडेफार नाव झाले ते या २०१५ मधेच!
फेसबुक व् वाट्स अप वर या वर्षी अनेक मित्र जोडले गेले.अनेक साहित्यिक मित्र यादीत आले.कुबेर सारखा फेसबुक ग्रुप जोडला गेला .ज्ञान व् माहीती मिळण्याची सोय झाली.अनेक साहित्यिक व् वाचक तेथे भेटले.चारोळ्या कथा व् कविता लिहिण्याचे सातत्य या ग्रुप्स च्या निमित्ताने वाढले.
आत्तापर्यंत च्या नोकरीत जवळ जवळ पंचवीस वर्षे मला फिल्ड मधे काम करावे लागले पण गेले सहासात वर्षे त्या मानाने कामाचा बोजा कमी असलेले पद सध्या मला मिळाले आहे.फार कटकटी नसलेले काम असल्यामुले ऑफिस च्या आघाडीवर २०१५ माझ्यासाठी अत्यंत चांगले गेले.
या वर्षी या ना त्या कारणाने अनेक ठिकाणी देवदर्शनासाठी प्रवास केला.कालभैरव नाथ जोतिबा,तुकाईमाता,कालूबाई,यमाई निरा नरसिंगपूर अशा अनेक देव देवतांचे मनोभावे दर्शन झाले. वयाची पंचावन्न वर्षे या अध्यात्मिक क्षेत्राकड़े नाही म्हटले तरी माझे दुर्लक्ष झाले होते. २०१५ मधे मनापासून आत्मिक समाधानासाठी मी श्री श्रीपादश्रीवल्लभ यांच्या चरित्राचे पारायण केले.दत्तजयंतीला श्री दत्त दिगंबरासमोर नतमस्तक झालो.आता या पुढील आयुष्यात अध्यात्म हाच आनंदी व समाधानी जगण्याचा आधार आहे याचे भान २०१५ या वर्षातच मला आले.
कौटुंबिक आघाडीवर मात्र २०१५ हे तसे यथायथाच गेले.या वर्षी कुटूंबात काही छोटे मोठे अपघात झाले. अगदी जीवाच्या संकटातून काही सदस्य वाचले.काही सदस्य सतत आजारी होते. घरात काही काळ अशांती होती पण प्रभू कृपेने यातून बाहेर पडण्याचा मार्गही मिळत गेला व् पुढेही मिळत राहील.
आर्थिक आघाडीवर ना नफा ना तोटा अशी काहीशी स्थिती होती.
२०१५ तर आता संपले आता उत्सुकता आहे २०१६ ची.हे वर्ष मात्र सर्वच आघाड्यांवर उत्साही भरभराटीचे असणार आहे यात शंका नाही . हे वर्ष मला तर उत्तम जाणारच आहे पण माझ्या बरोबरच आपणा सर्वाना आनंदाचे समाधानाचे उत्तम आरोग्याचे व् भरभराटीचे जाओ ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो .
शुभम भवतु.
.......प्रल्हाद दुधाळ